• फोन: ०२३६२ २२२५०८

परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांचे सामाजिक कार्य आणि शासनाकडून मिळालेले पुरस्कार

परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांनी आपल्या भक्तिमार्गातून सामाजिक कार्याची धुरा सांभाळली. अनेक प्रकल्प यशस्वीरित्या पार पाडले. परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांनी स्वकष्टातून विहीरी उभारल्या. आजूबाजूच्या नद्‌या-ओहोळांना दिवाळीच्यासुमारास बंधारे बांधून पाणी अडवून त्याचा उपयोग बागायती शेतीसाठी, मे महिन्यात पडणा-या पाण्याच्या दुष्काळापासून वाचण्यासाठी केला जात असे. शासनाच्या मदतीने जनजागृती करत नळयोजनेव्दारे पिण्याचे पाणी पोहोचवून पिंगुळी गाव टॅंकरमुक्त केला.
२००१ साली पिंगुळी गावी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवण्यासाठी समिती स्थापन केली व त्या समितीच्या अध्यक्षपदी परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराजांची निवड करण्यात आली. आपल्याबरोबर ३० ते ४० ग्रामसेवक घेऊन स्वत: हातात झाडू, फावडे, टोपल्या घेऊन स्वच्छता अभियान राबवले. या कामची दखल संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानतर्फे पुरस्कार देऊन घेण्यात आली. लोकांना मार्गदर्शन करत पिंगुळी गावाला गांव, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर जवळ जवळ ८५ लाख रूपये इनाम रूपाने मिळवून दिले आणि गावची किर्ती सर्वदूर पसरवली.

पिंगुळी गावाला मिळालेले पुरस्कार-

श्री. परमपूज्य अण्णामहाराज चॅरिटेबलट्रस्टव्दारे शालेय उपक्रम, वैद्यकिय उपचार, धान्यवाटप, व इतर बरेच सामाजिक उपक्रम राबवले जातात.

श्री. परमपूज्य सद्‌गुरू समर्थ राऊळमहाराजसेवा ट्रस्ट व श्री. परमपूज्य अण्णामहाराज चॅरिटेबल ट्रस्टकडे जमा होणारा काही निधी सामाजिक कार्यासाठी सर्व कायद्यांचे पालन करत वापरला जातो.

श्रीक्षेत्र. पिंगुळी येथील वार्षिक उत्सव